ASTROLOGY

सूर्याचा जबरदस्त प्रभाव; तूळ राशीतील राशीपरिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा

Surya gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. पंचांगानुसार, सूर्य १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करणार असून तो १६ नोव्हेंबरपर्यंत याच राशीत राहणार आहे. मेष ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशाने मेष राशीच्या अनेक लाभ होतील. या राशी परिवर्तनामुळे मेष राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबीयांची साथ मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. वृषभ ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या तूळ राशीतील राशी परिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल. हेही वाचा: शनी-शुक्र देणार बक्कळ पैसा; ३० वर्षानंतर कुंभ राशीत ग्रहांची युती, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य मिथुन सूर्याच्या तूळ राशीतील राशी परिवर्तनाने मिथुन राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.) None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.