नवी मुंबई : मागील आठवड्यात पडलेल्या पावसाचा भाज्यांच्या दर्जावर परिणाम होत आहे. भिजल्याने भाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात आवक वाढूनही भाज्यांच्या दरात वाढ होत आहे. राज्यसह नवी मुंबई, मुंबई उपनगरात मागील आठवड्यात पडलेल्या पावसाने भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. वाशीतील भाजीपाला बाजारात भाज्यांची १००-१५० गाड्यांची आवक वाढली असून ७१२ गाड्या दाखल झाल्या होत्या. परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणावर भिजलेल्या भाज्या दाखल होत आहेत. त्यामुळे भाज्यांचा दर्जा घसरत आहे. आणखी वाचा- सिडको हस्तांतरण शुल्क रद्द करण्याच्या निर्णयाकडे नवी मुंबईकरांचे लक्ष वाटाणा, फरसबी, टोमॅटो, आणि मेथीच्या दरात वाढ झाली आहे तर शिमला आणि हिरवी मिरचीच्या दरात घसरण झाली आहे. फरसबी अवघी ८ क्विंटल तर वाटाणा २४८ क्विंटल , टोमॅटो २०३३क्विंटल, मेथी २८३००क्विंटल दाखल झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात भाज्यांची १००-१५०गाड्यांची आवक वाढलेली आहे. परंतु पावसामुळे भाज्या खराब झाल्याने शेत मालाची प्रत घसरल्याने काही भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे, अशी माहिती एपीएमसीमधील घाऊक व्यापारी बाळासाहेब बडदे यांनी दिली. None
Popular Tags:
Share This Post:
महायुतीतील संघर्षात मविआला संधी? भाजपसमोर पक्षांतर्गत वाद; शिंदे गटाच्या नाराजीचे आव्हान
October 16, 2024What’s New
Spotlight
बँकेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून पतीच्या जमिनीवर परस्पर कर्ज
- by Sarkai Info
- October 15, 2024
Today’s Hot
-
- October 9, 2024
-
- October 9, 2024
-
- October 9, 2024
नवी मुंबई विमानतळावर वायू दलाच्या लढाऊ विमानाची चाचणी लवकरच
- By Sarkai Info
- October 8, 2024
Featured News
कळंबोली सर्कलची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ७७० कोटींचे उड्डाणपूल
- By Sarkai Info
- October 8, 2024
नवी मुंबई : बांधकाम नियमावलीचे कागदी घोडे
- By Sarkai Info
- October 8, 2024
Latest From This Week
नवी मुंबई पोलीस दलाच्या नावाचे एक्सवर बनावट खाते
NAVIMUMBAI
- by Sarkai Info
- October 4, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.